1 एप्रिल 2017
सखोल चर्चे नंतर खलील मुद्यावर एकमत झाले.
1. पाणी बचतीसाठी उपक्रम
-सर्व नळांना तुट्या बसवल्या जातील
-ज्या ग्रामस्थांचा नळ चालू राहील त्याला 500/- दंड आकाराला जाईल. दंड न भरल्यास ग्रामपंचायतीकडून कोणताही दाखल दिला जाणार नाही.
– शेतीमध्ये ज्यास्त पाणी लागणारे पीक घेण्यास बंदी आहे उदा ऊस,केळी इत्यादी. जर कोणी घेतलेच तर त्याला ठिबक अनिवार्य आहे.
2. जो व्यक्ती, घरातील पुरुष किंव्हा स्त्री वॉटर कप स्पर्धेमध्ये रोज सकाळी 8 ते 11 असे 3 तास श्रमदान करिन त्याला 2017 ची पाणी पट्टी माफ केली जाईल. पाणी पट्टी माफीचा दाखल ग्रामपंचायत देईल.
3. जे कुटुंब वॉटर कप स्पर्धे दरम्यान लावलेल्या 10 रोपांची देखभाल पुढील 3 वर्ष घेईल त्याची 2018, 19 आणि 20 ची घर पट्टी भूमिपुत्र फाउंडेशन देईन. वृक्षरोपण केलेली रोप वाटून दिली जातील व त्याचे निरीक्षण भूमिपुत्र कडून जर वर्षी केले जाईल.
4. हिवरा गावाच्या सर्व लोकसंख्या इतकी झाडे लावली जातील. तसेच लग्न होऊन गेलेल्या सर्व मुलींच्या आणि जावई च्या नावेही एक झाड लावले जाईल. सर्व मुलींना अखंड हरिनाम सप्त्याला दि 17 एप्रिल ते 24 एप्रिल ला उपस्तीत राहण्यास विनंती, ह्या काळावधीमध्येच आपण वृक्षरोपणासाठी लागणारे खड्डे घेणार आहोत. सर्व मुलींना भूमिपुत्राकडून भेटरूपी साडी व जावयाला टोपी टॉवेल दिला जाईल.
5. महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ग्रामसभा घेतली जाईल, ठिकाण विठ्ठल-रुक्मीनी मंदिरासमोर, हिवरा.
6. ग्रामपंचायतच्या प्रत्येक नियोजित कामाची माहिती ग्रामसभेला दिली जाईल. ग्रामसभेत जे ठरेल तेच काम ग्रामपंचायत हाती घेईल.
-सुदर्शन जगदाळे
[foogallery id=”3086″]
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message